29/08/2026
“शेवट नाही, एक विराम…”
मी खूप संघर्ष केला आहे,
खूप वाट पाहिली आहे,
खूप प्रयत्न केले आहेत,
आणि खूप रडले आहे.
आता वाटतं,
या सगळ्यालाच कुठेतरी विराम मिळावा,
शब्दच उरले नाहीत सांगायला,
आणि काहीच उरलं नाही धाडस करायला.
अनोळखी ताणांच्या वाटेवर,
दबावाचं ओझं घेऊन चालताना,
भावनाही आता थकून गेल्या आहेत,
आणि मनही शांततेत हरवून गेलं आहे.
हसले मी, जेव्हा आतून तुटत होते,
गप्प राहिले, जेव्हा शब्द ओरडत होते.
डोळ्यांत वादळं लपवली कितीतरी,
आणि चेहऱ्यावर ठेवली शांतता सारी.
पण कदाचित ही माझ्या कहाणीची अखेर नाही,
कदाचित मला फक्त थोडं थांबायचं आहे.
प्रत्येक लढाई आजच जिंकायची गरज नाही,
कधी कधी फक्त श्वास घ्यायचा आहे.
येऊ देत अश्रू,
राहू देत थोडं मौन,
प्रत्येक वेदनेचं कारण
आज सांगणंही आवश्यक नाही.
मी असे कितीतरी दिवस पार केले,
ज्यांना पार करणं अशक्य वाटलं होतं.
म्हणून कदाचित उद्याचा दिवस
आजपेक्षा थोडा वेगळा असेल.
मी खूप संघर्ष केला आहे,
खूप वाट पाहिली आहे,
खूप प्रयत्न केले आहेत,
आणि खूप रडले आहे.
पण आता माझ्या कहाणीला अंत नाही—
एक नवी सुरुवात आहे.
हळूहळू, शांतपणे,
एक श्वास… एक पाऊल… एक दिवस…
आणि पुन्हा स्वतःकडे परतण्याची
एक छोटीशी आशा आहे.
My words My feelings!!
Adv. Sulochana Sahu ✍️✍️