28/12/2025
*मतदार व उमेदवारातील नैतिकता;नेत्यांची घराणेशाही*
*गेल्या तीन ते चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकारखडल्या गेल्या होत्या, मात्र मा. न्यायालयाच्या आदेशाने निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वप्रथम नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी पार पडल्या, मात्र अनेक ठिकाणी आरक्षणाचे वाद व उमेदवाराची छाननी, सदस्य अपात्रतिशी संबंधित न्यायालयीन याचिका प्रलंबित होत्या, त्यामुळे या प्रकरणातील काही मतदारसंघातील निवडणुका २० डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आल्या; त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, सर्व टप्प्यांचे मतदान पूर्ण झाल्यावरच निकाल जाहीर करणे आवश्यक असल्यामुळे दोन्ही टप्प्यांची एकत्रित मतमोजणी २१ डिसेंबरला पार पडली, मात्र यावेळी मतदारांची व उमेदवारांची अनैतिकता जगासमोर आली तर घराणेशाहिच्या मर्यदेचा बांध फुटला, नागरिकांनी आपली चन-चन मोठ्या प्रमाणावर दूर करून घेतली तर उमेदवारांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर पूर्ण करून दिली. यामुळेच देणारे व घेणाऱ्यांच्या अनैतिकतेने लोकशाहीच्या तत्वांची पायमल्ली झाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.*
*निवडणुकांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीत चालणारी म्हणणाऱ्यांना चपरा, देवाणघेवाण आता उच्च,शिक्षित, प्रतिष्ठेची अंमलबजावणी करण्याच्या ( काही सोडलेतर ) घराघरा पर्यंत पोहचली तर झोपडपट्टी फक्त बदनाम आहे? खरतर गेल्या तीन-चार वर्षांपासून महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत,जिल्हापरिषद, पंचायत समित्यावर प्रशासक कार्यरत आहे, मात्र या काळात नागरिकांच्या प्रत्यक कामे झाली, तर विकास थांबला नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना सत्तेचे विकेंद्रीकरण करून स्थानिक पातळीवर लोकशाही आणणे, जनतेच्या गरजा " शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते " पूर्ण करणे स्थानिक भागात विकासाची गंगा आणून लोकशाहीत जगण्यासाठी स्थानिक पातळीवर स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी एक माध्यम आहे, मात्र आता या निवडणुकीत परिस्थिती हळू हळु बदलून या नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत युवकांची फळी धाब्यावर नंगा नाच, तर गल्लीबोळ्यात मद्यपेय व देवाण-घेवाण आचारसहितेत लोकशाही धिंडवडे उडवत, तर मतदानदिनी सुद्धा मतदान केंद्राच्या बाजूला देवाण-घेवानीचे अड्डे लोकशाहीला जिवंतपणी मरण यातना देत होते.*
*यासर्व घडामोडीत घराणेशाहीच पूर्वीपासून भारतीय